मुलींसाठी लेक लाडकी योजना हि योजना म्हणजे एक नव्या आशेचा किरण आहेत. मुली ह्या आजच्या समाजाचा आधारस्तंभ आहेत. मुलींचे शिक्षण, आरोग्य व सशक्तीकरण यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे. पण आजही अनेक परिवारांमध्ये आर्थिक अडचणी आहेत,व सामाजिक दृष्टिकोनांमुळे मुलींच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. याच समस्येचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने "लेक लाडकी योजना" ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रातील मुलींसाठी सुरू केली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी चालना देणे, व मुलींचा मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, तसेच शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे आणि सर्वात मोठे पाऊल म्हणजे बाल विवाह रोखणे असे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देते तसेच त्यांच्या शिक्षणाला व स्वावलंबनाला चालना देण्यासाठी हि योजना आहे.
➤ लेक लाडकी योजना म्हणजे काय?
"लेक लाडकी योजना" ही योजना महाराष्ट्र सरकारची एक सामाजिक व कल्याण योजना आहे, जी खासकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांवर लक्ष्य करते. या योजनेचा मूळ उद्देश हा मुलींच्या जन्माचे स्वागत करणे व त्यांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. या योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिच्या परिवाराला आर्थिक मदत केली जाते, जी तिच्या वयानूसार टप्प्याटप्प्याने मिळत राहील. ही रक्कम मात्र मुलीच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी व भविष्यातील संकटासाठी वापरली जाऊ शकते.
➤ योजनेबाबत माहिती
महाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण (लिंग गुणोत्तर) सुधारण्यासाठी व मुलींवरील सामाजिक अन्याय कमी करण्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. "लेक लाडकी योजना" त्या अनेक योजना मधील हि एक योजना आहे. २०२३ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती, व ती २०२५ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. या योजनेची प्रेरणा बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या मोठ्या राष्ट्रीय योजनांमधून घेण्यात आली आहे, पण ती स्थानिक गरजांनुसार थोडेफार बदल करण्यात आले आहेत.
➤ योजनेचे मुख्य उद्दिष्ट व फायदे
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे . ग्रामीण व शहरी भागांत अजूनही मुलगा-मुलगी असा भेदभाव थोड्याफार प्रमाणावर दिसतो. व अनेक कुटुंबे आर्थिक ताणामुळे मुलींच्या जन्मामुळे खूष नसतात. म्हणून या योजनेद्वारे सरकार मुलींच्या जन्माला सकारात्मकता देण्याचा प्रयत्न करत आहे. मुलीच्या जन्मानंतर मिळणारी आर्थिक सहकार्य कुटुंबाला आधार देते.
➤ शिक्षणासाठी चालना
या योजनेचा आणखी एक मोठा उद्देश असा आहे कि मुलींच्या शिक्षणाला मुख्यतः प्राधान्य देणे हा आहे. मुली जसजशा वयाने मोठ्या होतात, तसतशी त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी. या कारणामुळे पालकांना मुलींना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार व साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
➤ आर्थिक स्वावलंबन
मुली या 18 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना एकरकमी रक्कम मिळते, जी त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरु शकतात. यामुळे मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळणार. हे या योजनेचं मुख्य उद्देश आहे.
➤ योजनेची अंमलबजावणी व पात्रता
➤ कोण पात्र आहे व कोण नाही ?
ही योजना सर्वांसाठी नाही. याचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक अटी पूर्ण कराव्या लागतात:
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी हवे.
मुलीचा जन्म हा १ एप्रिल २०२३ नंतर झालेला हवा.
लाभार्थी हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे व त्यांच्याकडे रेशनकार्ड किंवा आधार कार्ड अनिवार्य आहे.
एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार .
➤ आर्थिक मदत कशी मिळते?
मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या कुटुंबाला ५,००० रुपये मिळतात.
पहिलीपासून ते पाचवीपर्यंत मुलीच्या शालेय शिक्षणादरम्यान दरवर्षी 2,000 रुपये.
सहावीपासून ते बारावीपर्यंत या काळात मुलीला दरवर्षी 4,000 रुपये.
मुलीचे 18 वर्षे वय पूर्ण झाल्यावर: एकरकमी 75,000 रुपये मिळणार.
ही रक्कम थेट मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाणार व त्याचा वापर मुलीच्या भविष्यातील कल्याणासाठीच व्हावा, अशी सरकारची अट आहे.
➤ समाजावर होणारा परिणाम
महाराष्ट्रातील अनेक भागांत लिंग गुणोत्तर आजही चिंताजनक आहे, म्हणून ही योजना मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देऊन ही असमतोलता कमी करण्याचा प्रयत्न करते.
➤ महिलांचे सशक्तीकरण
शिक्षित व स्वावलंबी मुली या उद्याच्या सशक्त महिला बनतील. या योजनेद्वारे मुली त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील.
➤ आर्थिक विकास
शिक्षित महिला या समाजाच्या आर्थिक विकासात मोठी महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून या योजनेद्वारे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार, व दीर्घकालीन आर्थिक फायदे मुलींना मिळणार.