मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना म्हणजे युवकांसाठी एक नोकरीची संधी नवी संधी आहे. आजच्या काळात देशातील तरुण हा देशाचा खूप मोठा कणा आहे. कारण त्यांच्या हातात भविष्य घडवण्याची ताकद आहे, पण त्यासाठी त्यांना खरंच योग्य मार्गदर्शन, कौशल्य व संधी मिळणं गरजेचं आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने याच उद्देशाच एक मोठं पाऊल म्हणजे "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सुरू केली आहे. ही योजना मुख्यतः तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी व त्यांना त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" ही महाराष्ट्र सरकारची एक मोठी महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. या योजनेचा मूळ उद्देश हा आहे कि - शिक्षित तरुणांना व्यावसायिक स्किल्स शिकवणं हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. कारण तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत होईल.
ही योजना खासकरून अशा तरुणांसाठी आहे जे पदवीधर आहेत, पण रोजगार मिळवण्यासाठी लागणारी कौशल्यं किंवा अनुभव नाही.आज महाराष्ट्रात हजारो-लाखो तरुण दरवर्षी पदवीधर होतात, पण त्यापैकी फक्त काही तरुणांनाच नोकरी मिळते. सर्वांना नाही. याचं कारण म्हणजे हे कि बाजारात मागणी असलेली कौशल्यं या पदवीधरांकडे नसतात. म्हणून दुसरीकडे, लहान-मोठ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असते, पण त्यांना योग्य उमेदवारच मिळत नाहीत. म्हणून ही दरी भरून काढण्यासाठी सरकारने ही मोठी योजना आणली आहे. यात तरुणांचा पण फायदा होणार व कंपन्यांना पण, यामुळे तरुणांना प्रशिक्षण मिळेल आणि उद्योगांना सक्षम कर्मचारी मिळतील.
➤ पात्रता
या योजनेत सहभागी उम्मेदवारांसाठी काही मूलभूत अटी व नियम आहेत. या अटी पूर्ण करणारे उमेदवारच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. खालीलप्रमाणे काही अटी व निकष आहेत.
1. वयाची अट
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उऊमेदवारी नोंदणाऱ्याच वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावं.
विशेष सवलत (उदा., दिव्यांग व्यक्तींसाठी) वयात थोडीफार सूट दिली जाऊ शकते.
2. शैक्षणिक पात्रता
उमेदवार कमीत-कमी 12वी पास असणं आवश्यक आहे. काही विशिष्ट प्रशिक्षणांसाठी पदवी, आय.टी.आय. किंवा डिप्लोमा असणं आवश्यक असू शकतो.
3. निवासी अट
उमेदवार हा महाराष्ट्राचाच रहिवासी असावा आणि त्याच्याकडे याचा खरा पुरावा (उदा., आधार कार्ड, मतदार ओळखपत्र) हे पुरावे असं बंधनकारक आहे.
4. बेरोजगार असणे
ही योजना मुख्यतः बेरोजगार तरुणांसाठी आहे. म्हणून, जे आधीपासून नोकरीला आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय करत आहेत, ते अपात्र ठरतील.
➤ प्रशिक्षणाचा कालावधी व प्रकार
या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी साधारणतः ३ ते ६ महिने असणार आहे. प्रशिक्षणाचे प्रकार हे कंपन्यांच्या गरजेनुसार असतात. उदाहरणार्थ,हे प्रशिक्षण तुमच्या पदवीनूसार देखील असणार आहे. यात तुम्हाला, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन, आरोग्य सेवा, बांधकाम, हॉस्पिटॅलिटी अशा अनेक क्षेत्रांमधल प्रशिक्षण हे तरुणांना दिलं जातं. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. यात सरकार त्यासाठी योग्य संस्थांशी भागीदारी करते.
➤ आर्थिक मदत
प्रशिक्षणादरम्यान तरुणांना मासिक स्टायपेंडही दिलं जातं हाच खूप सर्वात मोठा फायदा प्रशिक्षणार्थींचा आहे. हा स्टायपेंड त्यांच्या दैनंदिन खर्चाला खूप मोठा हातभार लावू शकतो व प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देतो. स्टायपेंडची रक्कम ठरलेली असते आणि ती प्रशिक्षणाच्या प्रकारावर अवलंबून असते.
➤ या योजनेचे काय आहेत फायदे
या योजनेत तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रशिक्षणानंतर तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. सरकारने अनेक खासगी कंपन्या व उद्योगांशी करार केलेले असतात , ज्यामुळे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना थेट नोकरी मिळण्याची संधी अधिक आहे. यात बेरोजगार तरुणांचा आत्मविश्वास वाढणार
जे बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात असतात पण वारंवार नोकरीसाठी अपयशाला सामोरं जातात, म्हणून त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. पण मात्र या योजनेद्वारे त्यांना कौशल्य शिकायला मिळतं त्यामुळे हे पदवीधरांना स्वतःवर विश्वास निर्माण होतो. हे कौशल्य त्यांना फक्त नोकरीच नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करायला देखील मदत करते.जेव्हा बेरोजगार तरुण स्वावलंबी होतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचं व पर्यायाने समाजाचं जीवनमान नक्की उंचावतं. ही योजना बेरोजगारी कमी करण्यात व राज्याच्या आर्थिक विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
➤ या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठीची प्रक्रिया हि ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे महतवाचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र व निवासाचा पुरावा जोडावा लागेल.
➤ या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाइन पर्याय देखील उपलब्ध आहे.
ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, असे तरुण पदवीधर स्थानिक तहसील कार्यालय अन्यथा जिल्हा कौशल्य विकास केंद्रात जाऊन अर्ज करू शकतात. तिथे कर्मचारी तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेसाठी मदत करतील.
➤ निवड प्रक्रिया
अर्ज केल्यानंतर तुमची पात्रता तपासली जाईल. त्यानंतर एक छोटी मुलाखत किंवा चाचणी घेतली जाऊ जाते, ज्यामुळे तुम्हाला कोणत्या क्षेत्रात प्रशिक्षण द्यायचं हे ठरवलं जातं.
टीप - मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी बारावी,आयटीआय, पदविका व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले बेरोजगार देखील अर्ज करू शकतात.