ग्रामीण भागामध्ये सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. ती म्हणजे Farmer id card (शेतकरी ओळख पत्रं ) शेतकरी बांधव सायबर कॅफे सेंटर वर जाऊन बनवून घेत आहेत. चला तर मग जाणून घेऊ नेमकं काय farmer id card आणि काय आहेत फायदे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला Farmer Id Card बंधनकारक आहे का ?
केंद्रसरकाने २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात Digital Agriculture Mission हाती घेतली. याच नाव Agristack आहे . त्यासाठी २८१७ कोटी देखील केंद्रसरकारने मंजूर केले. म्हणजेच काय तर कृषी क्षेत्रातील ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तत्परतेने आणि परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे. म्हणजे मग या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे जे काही सातबारा उतारा असतील त्यांना आधार कार्डशी लिंक करणार आहेत. त्यानंतर मग शेतकऱ्यांना Unique Id Number दिला जाणार आहे . यालाच विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजे Farmer Id Card असं म्हणतात. यामुळे जमिनीचे वेवेगळ्या ठिकाणी असणारे शेतजमिनीचे तुकडे सरकारला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यामुळे शेतकऱ्यांना वेवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळवणं सोयीस्कर होईल.
➤ Farmer Id Card कस बनवायचं ? २०२६-२७ पर्यंत सरकारच १२ कोटी शेतकऱ्यांचं Farmer Id Card बनवण्याचं सरकारच ध्येयं आहे.
तर farmer id Card साठी शेतकरी नोंदणी करू शकत नाहीये. कारण त्यातल्या काही तांत्रिक बाबीत जे अडचणी आहेत. त्यामुळे शेतकरी स्वतः नोंदणी करू शकत नाहीत. तर शेतकऱ्यांना जर Farmer Id Card बनवायचं असेल तर त्यांना जवळच्या Cyber Cafe Center ला जायचे आहे. शेतकऱ्यांनी सायबर कॅफेवर गेल्यानंतर कुठलीही फी देण्याची गरज नाहीये. असं सरकारनं आदेश दिला आहे. कारण प्रति Farmer Id Card साठी सरकारकडून सायबर कॅफे सेंटर ला १५ रुपये देण्यात येणार आहे.
➤ या शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय ?
१) सातबारा उताऱ्याशी आधार कार्ड लिंक होणार आहे.
२)यासोबतच पिकांची देखील नोंदणी होईल. ज्याला Crop Registry असं देखील म्हणता येईल.
३)गावनकाशांची (शेतनकाशा) नोंदणी देखील यासोबतच होणार आहे. यामुळेच सर्व डेटा सरकार कडे आणि एकाच साईट वर उपलब्ध होणार आहे. आणि हे सर्व काही शेतकरी ओळखपत्राशी लिंक असणार आहे.यामुळे तुमचा सर्व डेटा हा सरकार कडे असणार ज्यामुळे तुम्हाला त्वरित असा फायदा होणार आहे. जसे की तुम्हाला पीक कर्ज घ्यायचे असेल तर शेतकऱ्याकडे कोणत्या गावात कोणत्या गटात किती जमीन आहे. यावरच सरकार ठरवेल कि तुम्हाला किती पीक कर्ज द्यायचे आहे. यासोबतच पिकविम्याची जर का नुकसान भरपाई द्यायची असेल हे देखील सरकारला कळेल.
४)पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येईल . गेल्या काही दिवसांपासून एक अफवा फसरत आहे कि जर तुमच्याकडे शेतकरी ओळख पत्र नसेल या पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र कृषिमंत्रालयाकडून असं अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. तर कृषी विभागाकडून असं सांगितण्यात आले कि जे शेतकरी २०२५ पासून पीएम किसान सन्मान निधी नोंदणी करतील त्यांना मात्र सरकारने अनिवार्य केले आहे. या आधी पीएम किसान सन्मान निधी फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र कसलीही अडचण नाही. तरीही मात्र प्रत्येक शेतकऱ्याने Farmer Id Card हे काढून घ्यायलाच हवं जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक योजनसांसाठी सरकार अनिवार्य देखील करू शकते. आतापर्यंत ९० लाख शेतकऱ्यांनी या Farmer Id Card काढून घेतले आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घ्याचा आहे.