महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी
महाराष्ट्र हे भारतातील एक प्रगत राज्य आहे, जिथे विकासाच्या लाखो संधी उपलब्ध असतात. म्हणून या विकासाच्या प्रवासात तरुणांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने "मुख्यमंत्री फेलोशिप" ही अनोखी अभिनव योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना पदवीधारक तरुणांना सरकारच्या प्रशासनात सहभागी होण्याची एक मोठी संधी देते व त्यांना राज्याच्या विकासात योगदान देण्याची एक अमूल्य संधी मिळते.
➤ मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे काय?
मुख्यमंत्री फेलोशिप ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी 2015 मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांयांच्या हस्ते सुरू झाली होती. या योजनेचा मुळ उद्देश पदवीधारक तरुणांना राज्यातील प्रशासनात सहभागी करून घेणे व त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची आवड हे राज्याच्या प्रगतीसाठी वापरणे हा आहे. ही फेलोशिप 12 महिन्यांची आहे व यामध्ये निवड झालेल्या फेलोंना राज्य सरकारमार्फत राज्याच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळते. यामुळे या योजनेच्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव अगदी जवळून घेता येतो व शासनाला तरुणांचा दृष्टिकोन व नवीन संकल्पना मिळते. 2015 पासून या फेलोशिपची सुरुवात झाली आणि तेव्हापासून ती राज्यातील शिक्षित, पदवीधारक तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे. 2023 मध्ये हि योजना परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिवंत केली गेली व आता परत एकदा 2025-26 साठी नवीन फेलोशिप जाहीर करण्यात आलेली आहे. या फेलोशिप खासकरून मुख्य उद्दिष्ट म्हणजे पदवीधारक तरुणांना राज्याच्या प्रशासनात कार्य करण्याची संधी देणे, व त्यांना धोरण निर्मिती आणि राज्यातील अंमलबजावणी कश्या पद्धतीने पार पाडली जाते याचा अनुभव देणे आणि त्यांना भविष्यातील मोठ्या जबाबदाऱ्यांना तोंड देता याव असे घडवणे . याव्यतिरिक्त, आणि यात सरकारला तरुणांच्या कौशल्यांचा, तंत्रज्ञानाचा आणि नवीन संकल्पनांचा लाभ घ्यायचा आहे.
➤ फेलोशिप कालावधी व स्वरूप
ही फेलोशिप 12 महिन्यांची असणार आहे क निवड केलेल्या फेलोंना एकाच दिवशी कामाला सुरुवात करावी लागणार. हे काम पूर्णवेळ असेल, म्हणजेच फेलोशिपच्या कालावधी दरम्यान तुम्हाला दुसरं कोणतेही काम किंवा शिक्षण घेता येणार नाही. फेलोंना जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, सचिव किंवा इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी यांसोबत काम करण्यासाठी कार्यालयात नियुक्त केले जाते. फेलोंचा नियुक्तीचा अधिकार हा अर्थशास्त्र व सांख्यिकी संचालनालय घेते, आणि फेलोंना याबाबत निवड करण्याचा अधिकार नसतो.
कोण पात्र ठरू शकतं?
यासाठी काही पात्रता व निकष पूर्ण करावे लागतात.
➤ पात्रता निकष
➧ अर्ज करणाऱ्याचे वय हे 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे.
➧ अर्जदार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरी चालेल पण त्याला किमान 60% गुण असावेत.ज्यांनी उच्च शिक्षण (पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा प्रोफेशनल डिग्री) आहे, त्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार.
➧ तुम्हाला कमीत -कमी 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही केलेल्या प्रोफेशनल कोर्सचा भाग म्हणून केलेली इंटर्नशिप, व स्वयंरोजगाराचा अनुभ सुद्धा यात ग्राह्य धरला जाईल.
➧ अर्जदाराला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणे अत्यावश्यक आहे.
➧ तुम्हाला इंटरनेट व संगणक हाताळता आलं पाहिजे.
➤ कोणाला प्राधान्य मिळते?
ही योजना सर्व पदवीधारक पात्र तरुणांसाठी खुली आहे, पण तरी ज्यांच्याकडे उच्च शिक्षण व कामाचा अनुभव असणार आहे अशा उमेदवारांनाच प्रथम प्राधान्य दिले जाते.
➤ निवड प्रक्रिया कशी असेल?
➨मुख्यमंत्री फेलोशिप यासाठी निवड प्रक्रिया ही अत्यंत स्पर्धात्मक व पारदर्शक असते.
➧ ही निवड ऑनलाइन चाचणी होते.
➧ अर्जदारांना सर्वप्रथम एक ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी असते ती द्यावी लागते. ही चाचणी तुम्हाला इंग्रजी माध्यमातुन द्यावी लागेल, परंतु जिथे गरज असेल तिथे प्रश्नांचे मराठी भाषांतर देखील दिले जाते.
➤ यात तुम्हाला निबंध व मुलाखत द्यावी लागते.
➧ दुसऱ्या टप्प्यात पात्र उमेदवारांना तीन निबंध लिहायला लावतात. हे निबंध तुम्हाला मराठी भाषेत लिहायला लावतात व त्यांचे विषय तुम्हाला ईमेलद्वारे कळवले जातात. हे सर्व तीन निबंध उत्तम लिहिणाऱ्या उमेदवारांनाच मुलाखतीला बोलावले जाते. व मुलाखतीनंतर अंतिम निवड होते.